Verification: 4e7838d05962b884

‘मंत्री नारायण राणेंना’ अटक संपुर्ण घटणाक्रम… ‘Minister Narayan Rane’ arrested whole incident …

Spread the love
nr
                                                                                      नारायण राणें

मुंबई : कोकणात राजकीय घडामोडी प्रचंड वेगात घडत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नारायण राणेंना  आता कोर्टामध्ये हजर करण्यात आले आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय राणेंना पेलिसांनी अटक केले आहे. त्यानंतर राणे यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांना पोलिस कोठडी देण्यात येणार नाही.

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयात दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राणे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तरी यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

यावेळी नारायण राणेंना अटक करण्यासाठी आलेल्या रत्नागिरी पोलीस अधिक्षकांशी सुमारे तासभर चर्चा झाली. तेथे नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात थोडया कालावधीपुर्ते थांबविण्यात आले आहे. यानंतर शिवसेना विरुद्ध नारायण राणे शिवाय शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसार विषय सुरु होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दि. 24 रोजी दुपारी ३:20 च्या सुमारास  नारायण राणे यांना अटक करण्यात आले आहे. भाजपाची जनआशीर्वाद यात्रा नुकतीच सुरु झाली, त्यामध्ये बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली होती. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याचबरोबर त्यांना कानशिलात लगावण्याचंही विधानही त्यांनी केले होते.

दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरुध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानुसार नाशिक पोलिसांनी मंत्री  राणे यांच्या विरुध्द अटकेचे आदेश दिले आहेत.  

त्यानंतर राणे यांनी अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, तो रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका दाखल करा. असे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. त्याचबरोबर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यानंतर पालिसांनी राणे यांना अटक केली आहे.

Table of Contents

* केंद्रीय मंत्री नारायण राणेंना असताना अटक होऊ शकते का ?

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना मंत्री पदाचे संरक्षण आहे. त्यांना अटक होऊ शकते का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

त्याविषयी कायदे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, राणे यांना अटक होऊ शकते, मात्र ते अटकपूर्व जमीनही घेऊन अटक टाळू शकतात.

नारायण राणेंच्या विरोधात पोलिसांनी भादंवि नुसार कलम ५००, ५०५ (२), १५३ (ब) (१) आणि (क) ही कलमे लावण्यात आली आहेत. एखाद्याची बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणे असे या कलमांचे स्वरूप आहे.

कलम ५०० का चुकीचे आहे ?

पोलिसांनी नारायण राणेंविरोधात लावलेल्या कलमांपैकी कलम ५०० हे चुकीचे लावण्यात आले आहे. ” कारण ज्या व्यक्तीची बदनामी होते, तिनेच त्या विरोधात तक्रार क 3/5 न असते, इथे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तक्रार केली तर हे कलम लागु हाेते.

५०३, १५३ (बी) या कलामांच्या अंतर्गत राणेंना ३-५ वर्षे कारावास होऊ शकतो. ही कलमे बरोबर आहेत. राणेंनी केलेल्या वक्तव्यावर या कलमानुसार कारवाई होऊ

त्याआधी पोलिसांना नारायण राणेंना सीआरपीसी ऍक्ट ४१ अंतर्गत नोटीस पाठवावी लागेल. ती कराणेदाखवा नोटीस असते.

” तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तुम्हाला अटक का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करावी लागेल. मात्र याचे उत्तर येवो कि न येवो पोलिस अटकेची कारवाई करू शकतात, असेही वकील सरोदे म्हणाले

नारायण राणेंविषयी ( Narayan Rane )थोडक्यात माहिती –

नारायण तातू राणे हे महाराष्ट्र राज्याचे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1952 मध्ये झाला आहे. ते सध्या भारताच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून काम करत आहेत. याआधी ते महाराष्ट्र सरकारमध्ये उद्योग, बंदर, रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील होण्यापूर्वी जुलै 2005 पर्यंत शिवसेनेचे सदस्य आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला. तर 2018 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला. तसेच भाजपच्या नामांकनावर राज्यसभेवर निवडून गेले. 15 ऑक्टोबर 2019 रोजी ते भारतीय जनता पक्षात सामील झाले. त्याचबरोबर त्यांचा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील भाजपमध्ये विलीन झाला.

शिवसेना –

नारायण राणे (Narayan Rane)यांनी विसाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला आणि चेंबूर, मुंबई येथे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. 1999 मध्ये मनोहर जोशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले तेव्हा राणे त्यांच्यानंतर आले. शिवसेनेने राणे यांना 3 जुलै 2005 रोजी त्यांनी पक्ष सोडला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस –

नारायण राणे नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांना महाराष्ट्राचे महसूल मंत्री करण्यात आले. राणे यांनी कोकणातील त्यांच्या मालवण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक मागितली आणि 50,000 पेक्षा जास्त मतांच्या आघाडीने ते विजयी झाले. 21 जुलै रोजी राणे यांनी चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील उद्योग मंत्री पद सोडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.

2008 च्या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आले. चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवताच राणे यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात निषेध केला. ज्यामुळे त्यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

नंतर राणे यांनी काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांची माफी मागितली आणि नंतर त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात समाविष्ट करण्यात आले. त्यांना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री करण्यात आले. राणे यांनी त्यांचे दोन मुलगे- नितेश आणि निलेश यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात पदार्पण केले. 21 सप्टेंबर 2017 रोजी राणे यांनी स्वेच्छेने काँग्रेस सोडली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष –

1 ऑक्टोबर 2017 रोजी राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला. 

भारतीय जनता पक्ष –

राणे (Narayan Rane) यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नावाचा पक्ष 15 ऑक्टोबर 2019 रोजी कणकवली येथे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात विलीन केला. कॅबिनेट फेरबदलानंतर ते दुसऱ्या मोदी मंत्रालयात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री झाले. 

…………………………………………………

राज्यातील दोन शिक्षकांना 2021 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

…….For More Information Click hear…

भारताने आणि रशियाशी एके -103 रायफल्स खरेदी करण्यासाठी करार केला

भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना ; 54 खेळाडु भारताचे प्रतिनिधीत्व करणार

…….For More Information Click hear…

एनटीपीसीने देशातील सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प सुरू केला 

आता मातीचे आरोग्य स्मार्टफोनवरून कळेल, छोट्या शेतकऱ्यांना फायदा होईल

 

झायडस कॅडिलाने विकसित केलेल्या ZyCoV-D लसीला आपत्कालीन वापराची मान्यता

अमेरिका आणि ब्रिटन जी -7 बैठक घेणार | The United States and Britain will hold a G-7 meeting

भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना | Indian athletes leave for Tokyo Paralympics

“डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0” योजना | The “Defense India Startup Challenge 5.0” scheme

डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 1.0 (DISC), इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX), डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (DIO) लाँच केल्यानंतर तीन वर्षांनी नवी दिल्ली येथे 19 ऑगस्ट रोजी DISC 5.0 लाँच करणार आहे.

तालिबान कोण आहेत ? | history, facts of Taliban

15 ऑगस्ट, 2021 रोजी तालिबान नावाच्या कट्टरपंथी इस्लामी शक्तीने अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीनंतर देशातील बऱ्याच भागांवर नियंत्रण मिळवल्यानंतर काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने अफगाणिस्तानवर 1996 पासून 2001 पर्यंत अमेरिकन सैन्य …..

15 ऑगस्ट 2021 पासुन राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आले | The National Hydrogen Mission was launched on 15 August 2021

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे.

वनरक्षकांना सॅटेलाइट फोन देणारे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान बनले | Kaziranga National Park became the first national park in India to provide satellite phones to forest rangers

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे, जे सॅटेलाइट फोनचा वापर करत आहे. आसामचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी सुमारे 10 उपग्रह फोन काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांना दिले. 

रामसरच्या यादीत आणखी चार भारतीय आर्द्र भूमींची भर पडली | Ramsarchaya Yadit Anakhi four Indian wetlands covered

या ठिकाणी लुप्तप्राय इजिप्शियन गिधाड ( Egyptian Vulture), मिलनशील लॅपविंग(Sociable Lapwing), सकर फाल्कन आणि डाल्मेटियन पेलिकन ( Saker Falcon and Dalmatian Pelican) यांचे वास्तव्य…….

भारताच 75 वा स्वातंत्र्य दिन इतिहास, महत्त्व आणि दुर्मिळ तथ्ये | India is the 75th Independence Day History, significance and rare facts

1911 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या ‘भारतो भाग्यो बिधाता’ या गाण्याचे ‘जन गण मन’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. लाल, पिवळा आणि हिरव्या तीन आडव्या पट्ट्या असलेला भारतीय राष्ट्रध्वज….

  …….For More Information Click hear…

 

भारतातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना | Schemes for farmers in India

 

2021 इस्रोची GISAT-1 मोहीम अयशस्वी | 2021 ISRO’s GISAT-1 mission fails -भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी ठरले GISAT-1 मिशन आपले लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रह –03 लाँच करण्यात आले. या प्रक्षेपणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली कामगीरी झाली. परंतु क्रायोजेनिकच्या वरच्या टप्प्यात तांत्रिक अडथळा आल्यामुळे रॉकेट उपग्रह योग्य कक्षेत ठेवण्यात अपयशी ठरला आहे.  
  …….For More Information Click hear…

जागतिक युवा दिन 2021 | International Youth Day 2021: Date, Significance, History & Theme

पुढील 30 वर्षात जगाची लोकसंख्या 2 अब्ज लोकांनी वाढण्याची अपेक्षा शक्यता आहे. त्यामुळे असंख्य लोकांनी ओळखले आहे, की फक्त आराग्यदाई आहाराचे अधिक प्रमाणात उत्पादन करणे गरजेचे आहे. तसेच इतर महत्त्वाच्या आव्हानांना देखील संबोधित करणे आवश्यक आहे. जसे की 2030 च्या अजेंडाद्वारे अंतर्निहित जोडणी जसे गरीबी कमी करणे, सामाजिक समावेश, आरोग्य सेवा, जैवविविधता संवर्धन, आणि हवामान बदल या सर्वांचा समावेश आहे.

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी | Approval for the second and third phase of India Biotech nasal vaccine

भारत बायोटेकने नाकावाटे लस घेण्यात येणारी लस बरनविली आहे. त्यासाठी DBT-BIRAC ची मदत घेण्यात आली. त्यातील पहिल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे.
 

सागरी सुरक्षेवर UNSC बैठक संपन्न | UNSC Meet on Maritime Security

समुद्रांच्या कायदेशीर वापरावर आणि किनारपट्टीवरील समुदायाच्या सुरक्षेवर भर देण्यावर चर्चा करण्यात आली. ज्याव्दारे आंतरराष्ट्रीय कायद्याची पुष्टी केली जाते. 1982 च्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात समुद्राच्या कायद्यासह इतर वैश्विक साधनांमध्ये बेकायदेशीर कारवायांचा सामना करण्यासाठी कायदेशीर बाबी स्पष्ट करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *