Himachal Pradesh : अतिवृष्टीनंतर भूस्खलन ( landslides ) आणि पुरामुळे ( flood ) 22 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनांमध्ये 12 जण जखमी झाले असून सहा जण बेपत्ता आहेत. कांगडा जिल्ह्यातील चक्की रेल्वे पूल काल पुरात उद्ध्वस्त झाला. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोक्ता यांनी सांगितले की, मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
राज्य सरकारने संबंधित उपायुक्तांना पीडितांना आश्रय देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व जिल्ह्यांना भूस्खलन आणि पूरग्रस्त भागातील शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आणि शाळा आणि समुदाय केंद्रांमध्ये मदत शिबिरे चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी उपायुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ( landslides and floods in Himachal Pradesh )
Join Whatsapp for Daily Updates