Verification: 4e7838d05962b884

राज्यातील पूर परिस्थितीमध्ये कुठेही कोणतीही हानी होऊ नये – CM Eknath Shinde

Spread the love
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमध्ये कुठेही कोणतीही हानी होऊ नये, यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अशी माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दिली. राज्यातल्या पूरग्रस्त भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालेल्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
OBC वर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, इतर मागास वर्ग आरक्षणासंदर्भातल्या याचिकेवर आठवड्यानं पुन्हा सुनावणी होणार आहे. न्याय देवता इतर मागास वर्गाच्या बाजुनं न्याय देईल, असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.